Mumbai, फेब्रुवारी 13 -- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा श्रीरामपूर येथे जनसंवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदींच्या गॅरेंटीवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देशात आता कोरोना नाही, मात्र दुसरा हुकुमशाहीचा व्हायरस फोफावतोय. यापासून दोन हात लांब रहिलं पाहिजे. ज्या मातीत सोनं पिकवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी या सरकारला गाडावं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकारेंनी केली आहे.

देशातील शेतकरी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक पाहिजे ते दिल्लीत आहेत, त्यांचे आई वडील शेतकरी आहेत. असे सैनिक शेतकऱ्यांना रोखतात, मोठी भिंत लावतात. रस्त्यावर खिळे ठोकतात. हजारो लाखो शेतकरी दिल्लीच्या बाहेर जमले आहेत. त्यांना आत येऊ दिले जात नाही. ज्यांच्यामतांवर पंतप्रधान झालात ते तुमच्या घर...